Posts

Showing posts from April, 2023

आदिवासी बांधवांची अक्षय तृतीया

Image
                    अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत असाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या तिथीला खूप महत्त्वाचे मानले जाते .           अक्षय तृतीया या तिथीला एवढे महात्म्य प्राप्त होण्याचे कारण देखील तसेच आहे ,कारण असे सांगितले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा नदी इंद्रलोकांमधून पृथ्वीवरती अवतरली होती .याच दिवशी  परशुराम यांचा जन्म झाला होता. त्रेता युगाची सुरुवात याच दिवशी झाली होती असे सांगितले जाते .याच दिवशी व्यासांनी श्री गणेशा कडून महाभारत लिहून घेण्यास सुरुवात केलेली होती. याच दिवशी महाभारताचे युद्ध देखील संपलेले होते तसेच दुर्गामातेकडून महिषासुराचा वध याच दिवशी झाला होता .पांडवांना सूर्यदेवाकडून अक्षय पात्र याच दिवशी प्राप्त झालेले होते. याच दिवशी श्रीकृष्णाने परममित्र सुदाम्याचे पोहे देखील खाल्ले होते. याच दिवसापासून कुबेराला इंद्राचा खजाना देखील दिला गेला होता.                   आजच्याच दिवशी वृंदावन मधील श्रीकृष्ण भगवान ...

चारधाम यात्रा प्रारंभ

Image
             हिंदूंच्या जन्मामध्ये चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे.असं म्हणतात की मृत्यूपूर्वी या चारधाम यात्रा करणे खूप पुण्यकर्म मानले जाते.      परंतु अत्यंत बर्फवृष्टीमुळे सहा महिने या चारधाम यात्रा बंद असतात तर सहा महिने ही यात्रा सुरू करण्यात येते .येत्या 22 एप्रिल पासून या चारधाम यात्रेस सुरुवात होत असून केदारनाथ ,बद्रीनाथ ,गंगोत्री व यमुनोत्री या चारधाम तीर्थांच्या यात्रा सुरू होण्याच्या तारखा एप्रिल मधीलच आहेत. या चारही धामांचे वेगवेगळे महत्त्व आहे तसेच यांच्या संदर्भातील आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत व तितक्याच अनोख्या अशा आहेत .या चारधाम यात्रांपैकी केदारनाथ यात्रा किंवा केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याची तिथी आहे 25 एप्रिल 2023 . बद्रीनाथ धाम चे कपाट उघडण्याची तिथी आहे 27 एप्रिल तर गंगोत्री व यमुनोत्री या धामांचे कपाट उघडण्याची तिथी असेल 22 एप्रिल 2023 .       सद्यस्थितीला मूळ मूर्ती ज्या उखीमठ किंवा खालच्या मंदिरांमध्ये आणून ठेवलेले असतात, या मूळ मूर्ती आता त्यांच्या धामांकडे रवाना झालेले आहेत .     ...

जळुंचा हा उपयोग माहित आहे का?

Image
   जळू या रक्त पिणाऱ्या सजीवाबद्दल आपण वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच ऐकलेले आहे. या लेखामध्ये आपण जळू बद्दल किंवा जळवांबद्दल  माहिती बघणार आहोत.      सहसा सध्या वैद्यकीय विविध उपचारांमध्ये,रक्ताशी निगडित दूषितपणामध्ये तसेच मेडिकलशी संदर्भित विविध उपचारांमध्ये जळूंचा वैद्यकीय मार्गदर्शनाखाली, डॉक्टरांच्या सूचनेखाली वापर करताना आपल्याला दिसून येतो. जळू या रक्त ,मांस यावरती प्रामुख्याने वाढतात. अगदीच दाट जंगलामध्ये, दलदलीच्या ठिकाणी देखील या जळू आढळतात      सजीवाच्या शरीराला चिकटलेली जळू तिचे पोट पूर्णपणे भरेपर्यंत सजीवाच्या शरीरावरून निघत नाही.अशी जळू शरीराला चिकटली तर सुई टोचल्यापेक्षाही कमी वेदना होतात त्यामुळे लवकर समजून येत नाही. अशावेळी मीठ, हळद जर त्या जळू वरती टाकले, त्याच्या तोंडाजवळ टाकले तर ती जळू शरीरापासून दूर होते .मिठामध्ये ठेवलेली जळू लगेचच मरून ही जाते.      वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णाच्या त्वचेच्या खाली किंवा एखाद्या अवयवा जवळ साठलेले दूषित रक्त बाहेर काढण्यासाठी सुरक्षितरित्या जळूचा वापर केला जातो. अशी जळू रुग्ण...

100 वर्षांनंतरची शहरे

Image
  100 वर्षांनंतरची मुंबई   नवीन जगभरात प्रसिद्ध असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे अवतार बनवत असताना बघत असतो .परंतु याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून शंभर वर्षानंतर भारतातील प्रमुख शहरे कशाप्रकारे आपली कात टाकताना दिसतील याचा एक ढोबळ आढावा घेत काही अगदीच नाविन्यपूर्ण व औत्सुक्याने भरलेली शहरांची इमेजेस बनवण्यात आलेले आहेत ,ज्या आज नेटकऱ्यांमध्ये खूपच व्हायरल होताना दिसत आहेत,त्यातील काही निवडक छायाचित्रे... Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशयल इंटेलिजन्स  हे  टेक टिप्स  कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. एआय ही  यंत्रणा , विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते. AI चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) असा आहे. एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअ...

आदिवासींचा कल्पवृक्ष मोहु

Image
            आदिवासींसाठी वरदान मानल्या जाणाऱ्या मोहाच्या वृक्षास कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.बहुउपयोगी अशा प्रकारचा हा मोहाचा वृक्ष खूपच कामाला येतो.या वृक्षाच्या वेगवेगळ्या भागांपासून वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आदिवासींना वेळोवेळी होत असतात.          उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च - एप्रिलच्या सुमाराला या वृक्षाच्या टपोऱ्या,मोत्यांसारख्या फुलांपासून उत्तम प्रकारची मोहाची दारू बनवली जाते.याचे औषधी गुणधर्महि तितकेच आहेत.          ही फुले पूर्णतः गळून गेल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या मोहाच्या फळांपासून आरोग्यदायी, रुचकर व तितकीच गुणकारी भाजी देखील बनविली जाते.काहिशी अंड्याच्या भाजीप्रमाणे लागणारी ही भाजी आदिवासी भागामध्ये चवीने खाल्ली जाते.        आजूबाजूला मिळणाऱ्या वृक्षांच्या मोठ्या पानांचा द्रोण बनवला जातो व या द्रोणामध्येच या झाडाची ही फळे ज्याला मोहठ्या असे म्हणतात, ती गोळा केली जातात. विळा ,चाकू किंवा तत्सम धारदार वस्तूने त्याचेवरील साल काढले जाऊन आतील गर भाजीसाठी वापरला जातो.त...